Tuesday, November 24, 2020
Saturday, September 19, 2020
सर...
Wednesday, September 16, 2020
चितळे मास्तरांच्या निमित्ताने..
आज पुलंचं चितळे मास्तर पाहिलं. खूप काहीतरी काळाच्या मागे सुटल्याची हुरहूर लागली मनाला. साधारण 25 वर्षांपूर्वी पर्यंत अस्तित्वात असणारी शिक्षण पद्धती. मी नशीबवान म्हणून निसटता का होईना पण त्या पद्धतीचा स्पर्श मी अनुभवलाय. त्या शाळा, ती बाकडी, ते फळे, जुन्या खोल्यांसारखे पण स्वच्छ असलेले वर्ग आणि या सगळ्यांची ओढ लावणारे शिक्षक. शिकवणे हा केवळ अर्थार्जनाचा मार्ग नसायचा त्यांच्यासाठी..तो ध्यास असायचा, लोकसेवा असायची ! शिकवण्याची ती तळमळ आत्ताच्या चाकरमान्यांमध्ये दिसणे दुर्मिळ. हातावर छडी बसायची, पाठीत धपाटाही मिळायचा, पण ते abusing वाटलं नाही कधी.
तेव्हा वेगळी शिकवणी वगैरे प्रकार अगदीच कमी, ते पण 'ढ' मुलांना शिकण्याचा वेग मिळावा यासाठी सुरू झालेले. मी कधीही या 'शिकवणी' प्रकारात मोडले नाही. सहावी मध्ये असताना एका अपंग शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीला मदत व्हावी म्हणून काय तो शिकवणीचा घाट घातला होता आमच्या बाबांनी, पण ती शिकवणी आमची कमी आणि त्या शिक्षकाचीच जास्त असायची. असो.
आता सगळेच वासे उलटे फिरलेले दिसतात. कसे ते काही वेगळे सांगायची गरज नाही.
एक मात्र खरं की आत्ताच्या पिढीला मोठं झाल्यावर आपल्या शिक्षकांना आठवून डोळ्यात पाणी येणे, हात जोडले जाणे वगैरे प्रकार क्वचितच घडतील. शिक्षणपद्धतीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत ती कायम राहील!
Monday, September 14, 2020
I am missing those days...
Friday, September 11, 2020
मला वाटतंय..
Wednesday, September 9, 2020
पाहिजेच पाहिजे..
Friday, August 28, 2020
Wednesday, August 26, 2020
Monday, August 6, 2012
पाऊस....!
Friday, July 27, 2012
तो वटवृक्ष कोसळलेला...
सावलीत होते मी त्या शांत पहुडलेले
एक तिरीप ना उन्हाची, ना झळ वादळाची
होते किती निवांत, होती भ्रांत ना कशाची
होती फांद्यांवरी त्या कित्येक खगांची घरटी
ना पडे कधीही त्यावर नियतीची काकदृष्टी
त्या वृक्षामुळेच होती त्या माळराना शोभा
समृद्ध होता मुळांनी त्या धरतीचाही गाभा
परि एका क्षणी मुळाशी घाव असा झाला
नियतीने माळरानी होता कावा साधलेला
पहिला तेव्हा मी तो वटवृक्ष कोसळलेला
अन पारंब्या विखुरलेल्या......
पारिजात
Sunday, September 11, 2011
" प्रश्नं "
Tuesday, March 9, 2010
आठवणीच्या गावात...
मन आपलं वेडं वासरू. नकळत पुन्हा पुन्हा धाव घेतं तिकडे, पाऊलखुणा चाचपडत.. काही ठळक तर काही धूसर आणि काही काळाच्या ओघात मिटून गेलेल्या अश्या सर्वच ठश्यांच्या त्या पायवाटा तेवढ्या साक्षीदार..! अजूनही मुळ घट्ट रोवून उभी असणारी काही झाडं आणि काळासोबत उडून गेलेल्या पाखरांच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारी त्यांच्या फांद्यांवरची असंख्य घरटी. ती सगळीच पाखरं आपल्या ओळखीची, कारण हे आठवणीचं गावच मुळी आपलं...त्यातली बरीचशी फक्त आठवणीचाच भाग बनून उरलेली तर काही अजूनही आपल्या वर्तमानात रंग भरू लागणारी.
डोळयांसमोरून तरळणारे अनेक ऋतू...ऊन्हाच्या झळयांनी अंगाची लाही लाही करणारे, पावसाच्या बेधुंद सरींनी न्हाऊन निघालेले, गुलाबी थंडीने शहारलेले...
अश्या असंख्य आठवणीच्या त्या पायवाटा. त्यांच्यावारूनच त्या गावात फिरायचा आणि मनसोक्त हुंदडण्याचा या मनाचा आवडता छंद! या पाऊलवाटा जश्या गावात नेतात तश्याच कळत- नकळत बाहेरही आणतात, वर्तमानाचं भान करुन देतात आणि त्याच मनाला एक बळ देतात वर्तामानातून भविष्यात एकेक पाऊल टाकण्याचं..आठवणीच्या गावात एका नव्या पाऊलवाटेची सुरुवात करण्यासाठी..!
Monday, January 25, 2010
"अंकुर"
पुन्हा मातीत जन्म घेईल,
Friday, January 22, 2010
ते शब्द आणि ती अधूरी कविता ..
"ते शब्द जरी भुतकाळात हरवले,
तरी त्या शब्दांनी आठवणीतले क्षण मात्र फुलवले...
भावनांना शब्दांचे आवरण जरी नाही मिळाले,
तरी त्या भावनांनीच ते सुरेख स्नेहबंध जुळवले..
त्या अधु-या कवितेने खूप काही दिले...
तुझी सोबत दिली,
तुझ्यासोबत घालवलेली ती कातरवेळ दिली,
ते निखळ हसू दिलं,
ती मैत्रीची आश्वासक साथ दिली...
ते शब्द असेच राहूदेत,
त्यांचे हे अधुरेपणच संकेत आहे;
आपण पुन्हा-पुन्हा भेटण्याचा,
हातात हात धरून चालण्याचा,
डोळे ओले होईपर्यंत हसण्याचा,
आणि भेटल्यावर बांध फुटून वाहणा-या आसवांचाही ...!"
Monday, January 18, 2010
एक पत्र....
प्रिय ---,
"कधी कधी आयुष्य अश्या वळणावर आणून सोडतं की मागे वळणही शक्य नसतं आणि पुढे चालावं तर मार्ग सापडत नाही. कोणाची सोबत नसते आणि हातातून हात कधीच सुटून गेलेले... असतं ते फ़क्त लांबच लांब पसरलेलं रखरखीत ऊन आणि कोरं करकरीत आकाश. आशेचं एकही बीज जिच्या पोटी रुजणार नाही अशी रूक्ष धरती... आणि यात भर टाकायला धुळीचे प्रचंड लोट घेऊन आलेलं एक वादळ...
मग वाटतं की का हे सर्व माझ्याच वाट्याला? का मीच सहन करायचं? मागच्या जन्माचं फळ म्हटलं तरी किती कडू फळ चघळत बसायचं? का???
हे वादळ थोपवता येत नाहीये, थांबवता येत नाहीये. काय करायचं? धीर सोडून स्वतःला त्याच्या स्वाधीन करून द्यायचं आणि त्या वावटळीत ते नेईल तिकडे, नेईल तसं वाहत जायचं की स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड़ायचं?
याचं उत्तर काय हे आपल्याला माहिती आहेच. मान्य आहे की मनात खूप काही असतं. या मनाची ताकद इतकी प्रचंड असते की क्षितिजही अपुरी पडतात. पण मनाच्या झेपेला परिस्थितीची साथ कितपत आहे ते पण नक्कीच महत्वाचं आहे. मात्र ही परिस्थिती म्हणजे तरी काय?
आपल्या हे लक्षात येत नाही की आपण जगतो ते आपलं स्वतःचं जीवन आहे. कोणत्याही वावटळीने येऊन ते मातीमोल करावं इतकी कमी किंमत नक्कीच या जगण्याची नाही.
Wednesday, January 13, 2010
इये मराठीचिये नगरी...
Friday, January 8, 2010
HOLOCAUST
The living conditions of all camps were brutal. Everything was inhuman...
Now here is a question for all those who believe that there is a GOD for all good deeds and welfare of human being. God - who is the highest judge of the universe. Then, who gave the right to decide each of those things to that bloody Hitler? Wasn't this a slap on the mouths of all those who believe that God is always there for our goods & bads?
Who would have been the 'GOD' for those millions of Jews being tortured in the concentration camps? Whom could they pray for their relief? Were all Gods just witnessing the pains of their children or were they too afraid of the Devil named Hitler?











