Tuesday, November 24, 2020

Saturday, September 19, 2020

सर...



नभी अभ्रांच्या राशी
सर एकटी जराशी 
समांतर दुसरीशी
होई एकरूप कशी 

ओढ आली मातीची
तिला घेऊन मातीशी 
मिसळली सरींमध्ये
होती डबक्यांच्या राशी


Wednesday, September 16, 2020

चितळे मास्तरांच्या निमित्ताने..

 


आज पुलंचं चितळे मास्तर पाहिलं. खूप काहीतरी काळाच्या मागे सुटल्याची हुरहूर लागली मनाला. साधारण 25 वर्षांपूर्वी पर्यंत अस्तित्वात असणारी शिक्षण पद्धती. मी नशीबवान म्हणून निसटता का होईना पण त्या पद्धतीचा स्पर्श मी अनुभवलाय. त्या शाळा, ती बाकडी, ते फळे, जुन्या खोल्यांसारखे पण स्वच्छ असलेले वर्ग आणि या सगळ्यांची ओढ लावणारे शिक्षक. शिकवणे हा केवळ अर्थार्जनाचा मार्ग नसायचा त्यांच्यासाठी..तो ध्यास असायचा, लोकसेवा असायची ! शिकवण्याची ती तळमळ आत्ताच्या चाकरमान्यांमध्ये दिसणे दुर्मिळ. हातावर छडी बसायची, पाठीत धपाटाही मिळायचा, पण ते abusing वाटलं नाही कधी.

तेव्हा वेगळी शिकवणी वगैरे प्रकार अगदीच कमी, ते पण 'ढ' मुलांना शिकण्याचा वेग मिळावा यासाठी सुरू झालेले. मी कधीही या 'शिकवणी' प्रकारात मोडले नाही. सहावी मध्ये असताना एका अपंग शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीला मदत व्हावी म्हणून काय तो शिकवणीचा घाट घातला होता आमच्या बाबांनी, पण ती शिकवणी आमची कमी आणि त्या शिक्षकाचीच जास्त असायची. असो.

आता सगळेच वासे उलटे फिरलेले दिसतात. कसे ते काही वेगळे सांगायची गरज नाही.

एक मात्र खरं की आत्ताच्या पिढीला मोठं झाल्यावर आपल्या शिक्षकांना आठवून डोळ्यात पाणी येणे, हात जोडले जाणे वगैरे प्रकार क्वचितच घडतील. शिक्षणपद्धतीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत ती कायम राहील!


Monday, September 14, 2020

I am missing those days...


I am missing those days 
When the sun was shining bright 
And stars smiled in beautiful night 
And I could hold you near me really tight... 
I am missing those days.... 

I am missing those days 
With raindrops in my hand 
And thundering every strand 
When I could wrap myself in the slipping sand...
I am missing those days...

I am missing those days 
With no end to the sharing 
And all the times of caring 
With you the other world was felt just nothing.. 
I am missing those days



Friday, September 11, 2020

मला वाटतंय..


मला वाटतंय चंद्राला आज पकडून खाली आणावं 
दोन्ही हातांच्या मिठीत त्याला घट्ट कुरवाळून धरावं 
म्हणावं राहा थोडा वेळ माझ्याजवळ माझाच होऊन
पण तितक्यात कश्याला आकाशाने रागाने असं बघावं.. 
🌙☺

Wednesday, September 9, 2020

पाहिजेच पाहिजे..


पाहिजेच पाहिजे.. 
वाफाळता चहा, भिजलेली सकाळ आणि तू 
गरम कांदाभजी, पावसाची सर आणि तू 
उबदार पांघरूण, गुलाबी थंडी आणि तू 
ओलेतं रान, वारा बेभान आणि तू 
पाहिजेच पाहिजे..!!

Friday, August 28, 2020


सावळ्याचा रंग आभाळभर पसरला
बासरीतला सुर जणू सर होऊन बरसला

मन रंगले रंगले मेघासोबत सावळे
अंगभर पांघरले ओले सरींचे सोवळे

मी घेतला घेतला धरतीचा हिरवा वसा
रुजल्या ओलाव्याला आता कशाला आडोसा

- अनुराधा

Wednesday, August 26, 2020


आज पुन्हा सुरुवात करावी म्हणतेय
 पुन्हा एकदा लिहायला शिकतेय
 अडगळीतून शोधून स्वतःलाच पुन्हा
 धूळ झटकून जरा वापरायला काढतेय... 


 - 25 ऑगस्ट 2020, 11.56 pm

Monday, August 6, 2012

पाऊस....!

आज तुला पाहत रहावसं वाटतंय...बरसताना, गरजताना...

किती झेलले पावसाळे आम्ही, असं म्हणणा-यांच्या त्या शब्दांची गम्मत वाटते. खरंच तुला कोणी झेलू शकतो का? ओघळून जातोस हातातून नकळत...तू कोणाच्या तावडीत न सापडणारा...मुक्त, स्वच्छंद..!

दाटून आलास की हलकेच रिमझिमणारा आणि वादळाशी हात मिळवलास की बेछूट कोसळणारा.. असा तू मला नेहमीच हवाहवासा...निर्बंध, निराकार आणि तितकाच निर्मळही! नाला होऊन वाहीलास किंवा मातीने माखलास तरी न मळणारा तू !
प्रत्येक सर तितकीच आतुर प्रत्येक वेळी मातीत मिसळण्यासाठी. मातीत मिसळूनही स्वतःचं अस्तित्व जपणारी...
किती गूढ आहे तुझ येणं... बरसणं...मिसळणं...वाहणं...आणि परतणंही...! ज्याला हे गूढ उमगलं, त्याने मिळवलं. बाकी पामरांसाठी तू फक्त पाणी आणि भिजलेली माती म्हणजे चिखल...बस्स...!

Friday, July 27, 2012


पुन्हा पुन्हा हरवते तुझ्यात मी
नव्याने गवसते तुझ्यात मलाच मी...
जवळ असता तुझ्या वाटते
तुझ्यात विरघळून जावे मी;
तू दूर असता मात्र वाटते
क्षणभरात वितळून जावे मी.....

तो वटवृक्ष कोसळलेला...

एक झाड ते वडाचे पारंब्यांनी वेढलेले
सावलीत होते मी त्या शांत पहुडलेले

एक तिरीप ना उन्हाची, ना झळ वादळाची
होते किती निवांत, होती भ्रांत ना कशाची

होती फांद्यांवरी त्या कित्येक खगांची घरटी
ना पडे कधीही त्यावर नियतीची काकदृष्टी

त्या वृक्षामुळेच होती त्या माळराना शोभा
समृद्ध होता मुळांनी त्या धरतीचाही गाभा

परि एका क्षणी मुळाशी घाव असा झाला
नियतीने माळरानी होता कावा साधलेला

पहिला तेव्हा मी तो वटवृक्ष कोसळलेला
अन पारंब्या विखुरलेल्या......

पारिजात

काही सुगंध आठवणींच्या गंधाचा दरवळ पसरवून जातात. चालता चालता पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहून आज पुन्हा ते दिवस आठवले, जेव्हा असाच सडा अंगणभर पडून बारीक नारंगी नक्षी अंगावर लेवून शुभ्र चटई अंथरल्याचा भास व्हायचा. तो सुवास हवेच्या प्रत्येक झोतासोबत झुलत, दरवळत राहायचा. पावसाने भिजवलेली झाडे आणि पानांवरून ओघळणारे पारदर्शी थेंब... गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक सावरत त्या फुलांना वेचून ओंजळीत घेऊन श्वास भरून तो सुवास उरात साठवण्याचा प्रयत्न करणारी ती चिमुरडी मी... आज पुन्हा आठवले मी मलाच...!

Sunday, September 11, 2011

" प्रश्नं "

काही नात्यांची गुंतागुंत, खूप सारे प्रश्नं, सापडली म्हणताच पुन्हा हरवलेली त्यांची उत्तरं...परक्यांमधलं आपलेपण आणि आपल्यांमधलं परकेपण ! का आणतं एखाद्याला आयुष्य अश्या वळणावर? ज्यांना आयुष्यभर आपलं म्हणण्याची अतोनात इच्छा असते, तेच का आपल्याला परकं करून टाकतात? एकदाही विचार करत नाहीत नव्या नात्याचा, नात्यातल्या नाविन्याचा ? अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली एखाद्याला दाबून टाकून त्याच्या अपेक्षांची माती करणं कितपत योग्य आहे ? घट्ट कवटाळून घेण्यासाठी हात पुढे केल्यावर नेमका आपला हात झुगारून दिला जातो. मायेने जवळ घ्यावं असं वाटताच तुम्हाला कोणी उडवून लावावं. असं खरंच का होतं? नक्की चुकतं काय आणि कुठे? खरंच का आपली सगळी ओळखच संपवून टाकावी लागते आयुष्यातल्या काही नव्या नात्यांना वाव देण्यासाठी ? त्याशिवाय ते नाहीच का कधी आपले होऊ शकत? पण मग असं करताना स्वतःच्याच नजरेला नजर मिळवतांना आपलं अस्तित्वच संपल्याची जी भयानक जाणीव होते तिचं काय? ती वाटून घ्यायला तर कोणीच येत नाही न सोबत? तुम्ही स्वतःलाही पण तर गमावलेलं असतं तोवर....!!!

Tuesday, March 9, 2010

आठवणीच्या गावात...


आठवणीचे गाव... या गावी जाणारे रस्ते तर सगळेच ओळखीचे; प्रत्येक पायवाट आपली, आपल्याच पाऊलखुणानी बनलेली...

मन आपलं वेडं वासरू. नकळत पुन्हा पुन्हा धाव घेतं तिकडे, पाऊलखुणा चाचपडत.. काही ठळक तर काही धूसर आणि काही काळाच्या ओघात मिटून गेलेल्या अश्या सर्वच ठश्यांच्या त्या पायवाटा तेवढ्या साक्षीदार..! अजूनही मुळ घट्ट रोवून उभी असणारी काही झाडं आणि काळासोबत उडून गेलेल्या पाखरांच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारी त्यांच्या फांद्यांवरची असंख्य घरटी. ती सगळीच पाखरं आपल्या ओळखीची, कारण हे आठवणीचं गावच मुळी आपलं...त्यातली बरीचशी फक्त आठवणीचाच भाग बनून उरलेली तर काही अजूनही आपल्या वर्तमानात रंग भरू लागणारी.

डोळयांसमोरून तरळणारे अनेक ऋतू...ऊन्हाच्या झळयांनी अंगाची लाही लाही करणारे, पावसाच्या बेधुंद सरींनी न्हाऊन निघालेले, गुलाबी थंडीने  शहारलेले...

कितीतरी आठवणी...
अनवाणी पायांनी अंगणात  हुंदडणा-या बालपणीच्या, उत्सुकतेपोटी आईला विचारलेल्या निरागस प्रश्नांच्या, त्यांना तितक्याच सहजतेने तिने दिलेल्या उत्तरांच्या, बाबांनी सुनावलेल्या कड़क शब्दांच्या, पुन्हा त्यांच्याच कुशीत शिरून फुटलेल्या हुंदक्यांच्या, शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकलेल्या पहिल्या दिवसाच्या, होस्टेलवर परक्यांमध्येही सापडलेल्या आपल्या माणसांच्या, समजून घेणा-या जिवलग मित्र- मैत्रिणींच्या, कट्ट्यावर बसून तासंतास मारलेल्या गप्पांच्या, टपरीवरच्या चहा-समोस्यांच्या, परिक्षेच्या दिवसांत जागून काढलेल्या रात्रींच्या,  त्या चार भिंतीत रंगणा-या खुल्या व्यासपिठाच्या, दूर जाताना ओघळणा-या अश्रुंच्या, कमवायला लागल्यावर ऑफिस मधल्या काही आपल्यांच्या तर काही परक्यांच्या...

अश्या असंख्य आठवणीच्या त्या पायवाटा. त्यांच्यावारूनच त्या गावात फिरायचा आणि मनसोक्त हुंदडण्याचा या मनाचा आवडता छंद! या पाऊलवाटा जश्या गावात नेतात तश्याच कळत- नकळत बाहेरही आणतात, वर्तमानाचं भान करुन देतात आणि त्याच मनाला एक बळ देतात वर्तामानातून भविष्यात एकेक पाऊल टाकण्याचं..आठवणीच्या गावात एका नव्या पाऊलवाटेची सुरुवात करण्यासाठी..!















Monday, January 25, 2010

"अंकुर"


"अंकुर"

तात्पुरती ओल मिळालेल्या मातीत एक अंकुर फुटू पाहतोय,
डोकं वर काढून आकाशाला भीड़ण्याची स्वप्नं पाहतोय,
दोन पात्यांचे चिमुकले हात त्या आकाशाच्या दिशेने उभारतोय,

हेच हात आपले हजारोंच्या संख्येने वाढतील, 
पाना-फुला-फळानी सर्व दिशांनी बहरतील,
हवेच्या तालावर अनेक बहर झुलवतील,
पाखरांच्या घरट्याचे आश्रयदाते होतील, 
थकलेल्या वाटसरूवर सावलीचं पांघरुण घालतील,
चिमुकल्या फुलांनी जमिनीवर शिंपण टाकतील...

पण स्वप्न पाहता पाहताच झळ कसलीशी लागतेय,
तीच माती ओल संपून रुक्ष होऊ पाहतेय,
तेच आकाश उन्हाचे जळजळीत बाण चालवतेय,
तीच हवा उष्ण होऊन अंगअंग जाळतेय...

तळमळतोय अंकुर तो तीळतीळ जळताना,
पाहतोय उंचावलेले हात आपले पुन्हा मातीकडे झुकताना,
जीव जाता जाता मात्र आकाशाकडे पुन्हा एकदा पाहताना ,
अखेरच्या श्वासातही पुन्हा निक्षून सांगताना,
'पुन्हा ओल मिळेल
पुन्हा मातीत जन्म घेईल,
पुन्हा हवा झुलवेल,
पुन्हा अंकुर फुटेल...!'

   


Friday, January 22, 2010

ते शब्द आणि ती अधूरी कविता ..

या ओळी त्या काही शब्दांसाठी ज्यांची कविता कधी बनलीच नाही....

"ते शब्द जरी भुतकाळात हरवले, 
तरी त्या शब्दांनी आठवणीतले क्षण मात्र फुलवले...
भावनांना शब्दांचे आवरण जरी  नाही मिळाले, 
तरी त्या भावनांनीच ते सुरेख स्नेहबंध जुळवले..
त्या अधु-या कवितेने खूप काही दिले...
तुझी सोबत दिली, 
तुझ्यासोबत घालवलेली ती कातरवेळ दिली,
ते निखळ हसू दिलं,
ती मैत्रीची आश्वासक साथ दिली... 

ते शब्द असेच राहूदेत,
त्यांचे हे अधुरेपणच संकेत आहे;
आपण पुन्हा-पुन्हा भेटण्याचा,
हातात हात धरून चालण्याचा,
डोळे ओले होईपर्यंत हसण्याचा,
आणि भेटल्यावर बांध फुटून वाहणा-या  आसवांचाही ...!" 




Monday, January 18, 2010

एक पत्र....


नियतिच्या वाराने हतबल झालेल्या, खचलेल्या माझ्या एका प्रिय मैत्रिणीसाठी लिहिलेल्या  माझ्या  एका  पत्रातील मजकुर  :

प्रिय ---,
"कधी कधी आयुष्य अश्या वळणावर आणून सोडतं की मागे वळणही शक्य नसतं आणि पुढे चालावं तर मार्ग सापडत नाही. कोणाची सोबत नसते आणि हातातून हात कधीच सुटून गेलेले... असतं ते फ़क्त लांबच लांब पसरलेलं रखरखीत ऊन आणि कोरं करकरीत आकाश. आशेचं एकही बीज जिच्या पोटी रुजणार नाही अशी रूक्ष धरती... आणि यात भर टाकायला धुळीचे प्रचंड लोट घेऊन आलेलं एक वादळ...

मग वाटतं की का हे सर्व माझ्याच वाट्याला? का मीच सहन करायचं? मागच्या जन्माचं फळ म्हटलं तरी किती कडू फळ चघळत बसायचं? का???

हे वादळ थोपवता येत नाहीये, थांबवता येत नाहीये. काय करायचं? धीर सोडून स्वतःला त्याच्या स्वाधीन करून द्यायचं आणि त्या वावटळीत ते नेईल तिकडे,  नेईल तसं वाहत जायचं की स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड़ायचं? 

याचं उत्तर काय हे आपल्याला माहिती आहेच. मान्य आहे की मनात खूप काही असतं. या मनाची ताकद इतकी प्रचंड असते की क्षितिजही अपुरी पडतात. पण मनाच्या झेपेला परिस्थितीची साथ कितपत आहे ते पण नक्कीच महत्वाचं आहे. मात्र ही परिस्थिती म्हणजे तरी काय? 

आता थोड खोलात जाऊया. Philosophy नाही, पण वास्तव जाणून घ्यायचा एक साधा प्रयत्न करुन पाहुया. 
तर ही परिस्थिती म्हणजे नक्की काय? आपण आणि आपल्या भोवतीची माणसं, त्यांच्याशी असलेल्या आपल्या नात्यांची गुंतागुंत आणि बाकीचं भौतिक जग.. यातच चांगली- वाईट अशी सगळी माणसं समाविष्ट होतात. मग ती माणसं कोण? कोणाची? कोणासाठी? याचं उत्तर एकच- ही माणसं आपलीच आहेत आणि आपल्याचसाठी ती या  परिस्थितीचा भाग आहेत. फिरून फिरून उत्तर हेच की काही प्रमाणात आपल्या  परिस्थितीचे कळत-नकळत निमित्त आपणच असतो. परंतु ही परिस्थिती आपल्या मनासारखी नेहमीच नसते याचं कारण म्हणजे तिचा भाग असणारे सगळे स्वतंत्र आहेत आणि त्यांची त्यांच्यासाठीची  एक वेगळी परिस्थिती आहे, जिचा कदाचित आपण दुय्यम घटक असू शकतो. अश्या या परिस्थितीचे नियंत्रण आपल्या हातात नसते आणि हेच कारण आहे या परिस्थितीला घाबरण्याचे, तिच्यापुढे नमतं घेण्याचे...

आपल्या हे लक्षात येत नाही की आपण जगतो ते आपलं स्वतःचं जीवन आहे. कोणत्याही  वावटळीने येऊन ते मातीमोल करावं इतकी  कमी किंमत नक्कीच या जगण्याची नाही.
ते वादळ थोपवता येत नसलं तरी त्यात सापडल्यावर त्याच्या दिशेने त्याच्यासोबत फरफटत जाण्यात नक्कीच शहाणपण  नाही.
असेल ती सर्व शक्ती प्राणपणाने एकवटून त्यातून झगडून बाहेर पडण्यासाठी एकेक क्षण महत्वाचा असतो. तो एकेक क्षण गमावला की अस्तित्वाची माती व्हायला वेळ लागत नाही. गरज असते ती स्वतःतल्या जाणिवेला जागे ठेवण्याची आणि आत्मविश्वासाची..!"

हे पत्र इथे publish  केले कारण जे कोणी हे वाचेल त्याला कधी नियतीच्या वादळाचा सामना करण्यासाठी आशेचा एक किरण जरी मिळाला तरी  मी नशीबवान ठरेल.

Wednesday, January 13, 2010

इये मराठीचिये नगरी...

इये मराठीचिये नगरी, रामराम मंडळी...!

मराठी माणसाची अस्मिता जागी ठेवण्यासाठी तसे अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत, परंतु मला वाटते की अस्सल मराठी माणसाचा मराठी बाणा ही कधीही न झोपणारी गोष्ट आहे जिला जागे करण्याची मुळी गरजच नाही. हां आता, कधी कधी ती जरा सुप्तावस्थेत जाते, पण वेळेवर ती नक्कीच मराठी असण्याची लाज राखते आणि स्वाभिमानाने पेटूनही  उठते हेही नसे थोडके...!

थोडक्यात काय तर अशी ही मराठी अस्मिता बऱ्याचदा माझ्यासारख्या पामराच्या हृदयात असे काही तरंग उठवते की शब्दांच्या तालावर कधी भावना कागदावर उतरतात आणि कविता ज्याला म्हणता येइल अशी एखादी शब्दरचना तयार होते ते आकलनाच्या थोड़े पलीकडे जाते. त्यातलीच एक रचना इथल्या या पानावर:

" कुणीतरी अस्पष्टशी साद जणू घालतंय,
अलवार एक पाऊल मनामध्ये वाजतंय,
चाहुल कसली कळणारही नाही कदाचित,
पण कुठल्याश्या वळणावर जणू वाट कुणी पाहतंय...
सरेल रात्र,  उजाडेल सकाळ,
दुपारच्या उन्हात मात्र  सावली कुणीतरी देतंय..!

गोष्ट तीच जुनी नव्याने कुणीतरी सांगतंय,
चित्र तेच जुने, नव्या रंगात कुणी रंगवतंय..
चाहुल कसली कळणारही नाही कदाचित,
पण स्वप्नाशी वास्तवाची गाठ कुणीतरी बांधतंय..!"



(कृपया या रचनेत शास्त्रशुद्धता शोधू नये, रचनेच्या नियमांपेक्षा भावनांना प्राधान्य द्यावे ही नम्र विनंती..! नियमभंग झाला असल्यास क्षमस्व!)




Friday, January 8, 2010

HOLOCAUST

While searching some information on internet, coincidently I came across with some search results related to Hitler. Though I know much about History related to Hitler as most of us know, I went on reading the information on some of those pages. That was all about HOLOCAUST by Hitler. "Holocaust" is a word of Greek origin meaning "sacrifice by fire."
But after year 1945 this word has been used to define the genocide of jews as 'the systematic, bureaucratic, state-sponsored persecution and murder of approximately six million Jews by the Nazi regime and its collaborators.'
I don't wish to discuss the history here, but I just want to share the stranger feelings of such a cruel destruction of humanity by humans only.
It was all horrible to know more & more about the facts. Everything which I read about the concentration camps is disturbing. The reality is unbelievable.
Terms used are such as forced labor camps, transit camps, prisoner-of-war camps, cruel medical experimentation, gas chambers, pressure chambers, chemical injections, brutal surgeries, extermination through labor, death squads & so on...
The living conditions of all camps were brutal. Everything was inhuman...
Now here is a question for all those who believe that there is a GOD for all good deeds and welfare of human being. God - who is the highest judge of the universe. Then, who gave the right to decide each of those things to that bloody Hitler? Wasn't this a slap on the mouths of all those who believe that God is always there for our goods & bads?
Who would have been the 'GOD' for those millions of Jews being tortured in the concentration camps? Whom could they pray for their relief? Were all Gods just witnessing the pains of their children or were they too afraid of the Devil named Hitler?



Tuesday, January 5, 2010

Are You Happy?



I am currently reading a book by Paulo Coelho i.e. 'The Zahir'. I would like to share here a very nice conversation in it. This really makes us think over the Concept of Happiness which we have very rarely considered to be like this.
-
"Some people appear to be happy, but they simply don't give the matter much thought. Others make plans: I'm going to have a husband, a home, two children, a house in the country. As long as they're busy doing that, they're like bulls looking for the bullfighter: they react instinctively, they blunder on, with no idea where the target is. They get their car, sometimes they even get a Ferrari, and they think that's the meaning of life, and they never question it. Yet their eyes betray the sadness that even they don't know they carry in their soul. Are you happy?"
"I don't know."
"I don't know if everyone is unhappy. I know they're all busy: working overtime, worrying about their children, their husband, their career, their degree, what they're going to do tomorrow, what they need to buy, what they need to have in order not to feel inferior, etc. Very few people actually say to me: 'I'm unhappy.' Most say: 'I'm fine, I've got everything I ever wanted.' Then I ask: 'What makes you happy?' Answer: 'I've got everything a person could possibly want—a family, a home, work, good health.' I ask again: 'Have you ever stopped to wonder if that's all there is to life?' Answer: 'Yes, that's all there is.' I insist: 'So the meaning of life is work, family, children who will grow up and leave you, a wife or husband who will become more like a friend than a real lover. And, of course, one day your work will end too. What will you do when that happens?' Answer: There is no answer. They change the subject."
"No, what they say is: 'When the children have grown up, when my husband—or my wife—has become more my friend than my passionate lover, when I retire, then I'll have time to do what I always wanted to do: travel.' Question: 'But didn't you say you were happy now? Aren't you already doing what you always wanted to do?' Then they say they're very busy and change the subject."
-

Is it really like this? We need to think again on what we exactly want and what we are actually going for!