या ओळी त्या काही शब्दांसाठी ज्यांची कविता कधी बनलीच नाही....
"ते शब्द जरी भुतकाळात हरवले, तरी त्या शब्दांनी आठवणीतले क्षण मात्र फुलवले... भावनांना शब्दांचे आवरण जरी नाही मिळाले, तरी त्या भावनांनीच ते सुरेख स्नेहबंध जुळवले.. त्या अधु-या कवितेने खूप काही दिले... तुझी सोबत दिली, तुझ्यासोबत घालवलेली ती कातरवेळ दिली, ते निखळ हसू दिलं, ती मैत्रीची आश्वासक साथ दिली...
ते शब्द असेच राहूदेत, त्यांचे हे अधुरेपणच संकेत आहे; आपण पुन्हा-पुन्हा भेटण्याचा, हातात हात धरून चालण्याचा, डोळे ओले होईपर्यंत हसण्याचा, आणि भेटल्यावर बांध फुटून वाहणा-या आसवांचाही ...!"